SP MLA Iqbal Mahmood : (म्हणे) ‘भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला नसता, तर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला असता !

संभल (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल महमूद यांचे विधान

इक्बाल महमूद

संभल (उत्तरप्रदेश) – जर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला नसता, तर भारतातही एखादा मुसलमान पंतप्रधान झाला असता. सध्या भारतात सुमारे ३० ते ३२ कोटी मुसलमान आहेत; पण आम्ही कधी विचारही करू शकत नाही की, आम्ही पंतप्रधान होऊ शकतो, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे सलग ७ वेळा निवडून आलेले आमदार इक्बाल महमूद यांनी केले आहे.

विभाजनाच्या दिवसाविषयी आम्ही पश्चात्ताप करतो ! – आमदार इक्बाल महमूद

आमदार महमूद पुढे म्हणाले की,

देश स्वतंत्र झाला, तेव्हा महंमद अली जिना यांनी भारताचे विभाजन घडवले. ज्यांना भारताशी प्रेम होते, ते येथेच राहिले आणि ज्यांना जिना यांच्याशी नाते जोडायचे होते ते पाकिस्तानला गेले. आम्ही त्या दिवसाला दोष देतो; कारण आज आमची आतासारखी परिस्थिती राहिली नसती. जर पाकिस्तान वेगळा झाला नसता, तर आम्हीही पंतप्रधानपदाचे दावेदार ठरलो असतो आणि आमच्याही समाजातून पंतप्रधान झाले असते.

संपादकीय भूमिका

  • भारतातील ९ राज्यांत हिंदु अल्पसंख्यांक आहेत. तेथे कधीही हिंदु मुख्यमंत्री होऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. अशा वेळी मुसलमानांना मात्र पंतप्रधानपदाची स्वप्ने पडतात, हे लक्षात घ्या !
  • पंतप्रधानपदामुळेच नाही, तर पाक आणि बांगलादेश येथील मुसलमानांची स्थिती पाहून आता मुसलमानांना भारताचे महत्त्व समजू लागले आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचे विधान ते करत आहेत !
  • जर फाळणी झाली नसती, तर अखंड भारत निर्माण होऊन हिंदुच पंतप्रधान झाले असते, हे लक्षात घ्यायला हवे !