देशातील सर्वांत प्राचीन अंबरनाथ येथील शिवमंदिराला तडे, शिल्पे भग्न; मात्र संवर्धनाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

मंदिरावरील तुटलेले शिल्प

मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – ९५० वर्षे पुरातन असलेल्या आणि भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिराला तडे गेले आहेत.

अनेक ठिकाणी मंदिराचे अवशेष तुटले आहेत, मंदिरावरील अनेक शिल्पे भग्न झाली आहेत. इतकी दुरवस्था होऊनही भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराच्या संवर्धनासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. हे मंदिर देशातील  प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

मंदिराचा तुटलेला भाग

‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत केलेल्या अर्जावरून अंबरनाथ मंदिराच्या संवर्धनासाठी किंवा डागडुजीसाठी पुरातत्व विभागाकडून कोणत्याही प्रकारे सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मुंबईच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

श्री. प्रीतम नाचणकर

अशी आहे मंदिराची दुरवस्था !

या मंदिरावर भगवान श्रीविष्णु, गणपति, नृसिंह या देवतांसह अन्य देवतागण नृत्य करतांनाची शिल्पे आहेत. यांतील बहुतांश शिल्पे तुटलेली आहेत. काही शिल्पांची शिरे तुटली आहेत, तर काहीचे अवयव तुटले आहेत.

अनेक ठिकाणी मंदिराचे काही भाग तुटले आहेत. मागील अनेक वर्षे या मंदिराच्या संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सद्यःस्थितीत या मंदिराची स्थिती अत्यंक बिकट झाली आहे.