(म्हणे) ‘अडवाणी, मुरली मनोहर जोशी, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या घरातील मुलींचे पाय कधी तोडणार ?’ – KK Mishra

लव्ह जिहाद’वरून आवाहन करणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांचे हास्यास्पद आव्हान

काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – दीपावलीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदूंना आवाहन केले, ‘हिंदूंची मुलगी दुसर्‍या धर्मातील व्यक्तीशी विवाह करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आधी तिला समजवा. जर तिने ऐकले नाही, तर तिचे पाय तोडून टाका’; परंतु तुम्ही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामलाल यांच्या भाच्या, भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मुलगी आणि शाहनवाज हुसैन यांच्या पत्नीसहीत डझनभर भाजप नेत्यांच्या घरातील मुलींचे पाय तोडायला जाणार आहात का ? कारण या सर्व महिलांनी ‘तुमच्या भाषेत’ परधर्मियांशी (मुसलमानांशी) लग्न केले आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा यांनी ‘एक्स’वर लिखाण (पोस्ट) करत विचारला आहे.

के.के. मिश्रा यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आव्हान देत म्हटले की, परधर्मीय कोण आहेत ? तुम्ही त्यांच्या धन्यांचे केवळ पायच नव्हे, तर हातही तोडा. तुमच्यात धाडस आहे का ? कि तुम्ही केवळ गप्पा करणार आहात ?

संपादकीय भूमिका

  • साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले आवाहन पचनी पडलेले नसल्यानेच काँग्रेसच्या नेत्याने लव्ह जिहादी मुसलमानांचे समर्थन करण्यासाठी अशा प्रकारचे आव्हान दिले आहे. साध्वीचे आवाहन कुणासाठी आहे, हे हिंदूंना ठाऊक आहे. त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी अशी कितीही हास्यास्पद आव्हाने दिली, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही !
  • अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या मुलींनी कोणत्याही मुसलमानाशी कधी विवाह केलेला नाही. असे असतांना अशा प्रकारचे खोटे विधान करून त्यांना अपकीर्त केल्यावरून मिश्रा यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !