|

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत लोकसभेचे १२० घंटे कामकाज चालणे अपेक्षित असतांना सदस्यांनी गदारोळ केल्याने कामकाज केवळ ३७ घंटे काम झाले. या अधिवेशनात लोकसभेचे ८३ घंटे कामकाजाचा कालावधी वाया गेला असून केवळ ३१ टक्के काम झाले. राज्यसभेतही १२० घंट्यांचे कामकाज होणे अपेक्षित असतांना गदारोळामुळे केवळ ४७ घंटे कामकाज झाले. खासदारांनी घातलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे ६२ टक्के वेळ वाया गेला. लोकसभा आणि राज्यसभा येथील वेळेचा अपव्यय झाल्यामुळे जनतेचे २०४ कोटी रुपये वाया गेले आहेत.
१. २४ जुलै आणि १ ऑगस्ट या दिवशी लोकसभेचे कामकाज केवळ १२ मिनिटे चालले, तर २३ जुलै या दिवशी कामकाज १८ मिनिटे चालले. ४ ऑगस्ट या दिवशी लोकसभेचे कामकाज २४ मिनिटांत स्थगित करावे लागले.
२. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ दिवस चालले. या २१ दिवसांत लोकसभा १ घंटा किंवा त्याहून अधिक काळ केवळ ५ दिवस चालली.
३. भारताच्या पहिल्या लोकसभेचे कामकाज १४ सत्रांमध्ये झाले होते. या १४ सत्रांमध्ये कामकाज ३ सहस्र ७८४ घंटे चालले. वर्ष १९७४ पर्यंत प्रत्येक लोकसभेच्या सत्रांमध्ये सततच्या बैठकांची संख्या १०० पेक्षा अधिक होती.
४. वर्ष १९७४ नंतर आणि वर्ष २०११ पर्यंत केवळ ५ वेळा सभागृहातील बैठकांची संख्या १०० पेक्षा अधिक होती.
५. पहिल्या लोकसभेत ३३३ विधेयके संमत झाली. १७ व्या लोकसभेत म्हणजेच गेल्या लोकसभेत वर्ष २०१९ ते वर्ष २०२४ या कालावधीत २२२ विधेयके संमत झाली. या वेळी जनतेसाठी महत्त्वाची विधेयके संसदेत गदारोळ असतांनाही विरोधी पक्षाच्या चर्चेविना संमत झाली.
संपादकीय भूमिका
|
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ