|

पुणे – सुशिक्षित समाजालाच वैज्ञानिक दृष्टीकोनाची अधिक आवश्यकता आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन झाल्याविना वैज्ञानिक दृष्टीकोन येत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी अंधश्रद्धेचे उच्चाटन आवश्यक आहे, अशी भूमिका माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडली.
“Scientific approach comes only after eliminating superstitions” – Former Justice Abhay Oak on Dabholkar’s death anniversary.
This remark insults the faith of 100 crore Hindus. Hindu Dharma is rooted in science; yet only Hindu traditions are attacked in the name of ‘science’. A… pic.twitter.com/RVBfCHBjZj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2025
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० ऑगस्ट या दिवशी झालेल्या १२ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर न्या. ओक यांनी मत मांडले.
या वेळी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ‘युवक क्रांती दला’चे अन्वर राजन, ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’चे डॉ. शमशुद्दीन तांबोळी, ज्येष्ठ आय.पी.एस्. अधिकारी अशोक धीवरे, प्रा. नितीश नावसागरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आदी उपस्थित होते.
पक्षपात करणारे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले !

या वेळी माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी सांगितले की, आजकालच्या काळात अल्पसंख्य समाजाला होणारा त्रास हा पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विरोधात आहे. कारण वैज्ञानिक दृष्टीकोनाने समजूतदार असलेला समाज समतेचा पाठीराखा असतो. (आजकालच्या काळात अल्पसंख्य समाजाला नव्हे, तर बहुसंख्य हिंदूंनाच अल्पसंख्यांक समाजातील काही प्रवृत्तींमुळे सर्वाधिक त्रास होत आहे. मंदिरांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादसारखे प्रकार आणि हिंदूंच्या मिरवणुकांवर होणारी आक्रमणे यांकडे माजी न्यायमूर्ती गोखले डोळेझाक करत आहेत. पक्षपात करणे, हा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव नाही का ? ‘असा पक्षपात करून माननीय माजी न्यायमूर्तींनी त्यांच्या कार्यकाळात किती निर्णय दिले असतील ?’, असा अल्पसंख्यांकांकडून मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केला, तर त्यात काय चुकीचे ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
शाळा-महाविद्यालयात भगवे वस्त्र वाटण्यास पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मनाई
शिक्षकी पेशाचे अधःपतन !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना