|

पुणे – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी १२ वर्षे पूर्ण होणार आहेत. या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली असली, तरी ‘सूत्रधार’ अजूनही मोकाट आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आणि अनिल वेल्हाळ यांनी या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जादूटोणाविरोधी कायदा करण्याची मागणी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही. ही अक्षम्य दिरंगाई आहे, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
संपादकीय भूमिकादाभोलकर कुटुंबियांच्या दबावामुळेच या हत्येचे अन्वेषण भरकटलेले आहे, त्यामुळे खरेतर त्यांचीच चौकशी होणे आवश्यक आहे ! |
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर