Prayagraj Kanwar Yatra Attack : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल गावात कावड यात्रेवर तलवार आणि काठ्या यांद्वारे आक्रमण

अनेक कावड यात्रेकरू घायाळ

प्रयागराज (उत्तरप्रदेश)  – प्रयागराजच्या मऊआइमा तालुक्यातील सराय ख्वाजा गावात शुक्रवार, १८ जुलै या दिवशी कावड यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी तलवारी आणि काठ्या यांसह आक्रमण केले. येथे नमाजपठण चालू असतांना कावड यात्रेत डीजे (मोठी संगीत यंत्रणा) वाजवण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून हे आक्रमण झाले. पोलिसांनी १५ ज्ञात, तर ६५ अज्ञात यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी बेलाल उपाख्य बब्बू, तुफैल अहमद, महंमद तस्लीम, महंमद आरिफ, शाहबे आलम आणि गुड्डू उपाख्य अहमद अली यांना अटक केली आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घटनेच्या वेळी काही कावड यात्रेकरूंना तलवार दाखवून धमकावले गेले, तर अनेकांना मारहाण झाली. यात काही कावड यात्रेकरू घायाळ झाले. डीजे बलपूर्वक बंद पाडण्यात आला. या गावात अनुमाने ६० टक्के मुसलमान असून ते नेहमीच स्थानिक हिंदूंवर दबाव आणत असतात.

मुसलमानांकडून नियोजित आक्रमण !

१. गावकरी राजेंद्र कुमार यांनी सांगितले की, आमचे घर मुसलमानांच्या वस्तीत आहे. आमचे दुकानही तिथेच आहे. गेल्या आठवड्यापासून अयान, झिशान, महंमद राजू आणि तौफीक आम्हाला सतत विचारत होते की, कावड यात्रा कधी निघणार, किती वाजता निघणार ? आम्ही डीजेसह यात्रेसाठी बाहेर पडल्यावर लगेच आक्रमण झाले. हे सर्व आधीपासूनच नियोजित होते.

२. स्थानीय महिला उष्मिला देवी यांनी सांगितले की, ही पूर्ण घटना आधीपासून आखलेली होती. म्हणूनच ते लोक आधीपासून तलवारी आणि लाठ्या यांसह सिद्ध होते. आमच्या धार्मिक कार्यक्रमांना नेहमी अडथळे आणले जातात.

३. सुनीता देवी म्हणाल्या की, वीज दुरुस्तीच्या निमित्तानेही त्यांनी वाद घातला. एकदा तर माझ्या मुलीला बलपूर्वक उचलून नेऊन मारहाण केली.

४. सोनू पासी यांनी सांगितले की, मोहरमसाठी ४-५ दिवस सतत डीजे वाजवले जातात, शाळा बंद होतात; पण हिंदूंचे सण आले की, ते लोक नेहमीच गोंधळ घालतात.

संपादकीय भूमिका

  • हिंदूबहुल भारतात, राज्यांत, जिल्ह्यांत, शहरांत, गावांत मुसलमान निवांत रहातात, उलट हिंदूंवर आक्रमण करतात; तर मुसलमानबहुल भागात हिंदूंना सण साजरे करता येत नाहीत, धार्मिक उत्सव साजरे करता येत नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते !
  • उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना ही स्थिती आहे, तर अन्य राज्यांतील हिंदूंची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येत नाही !
  • गाव मुसलमानबहुल झाले की काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रयागराज जिल्ह्यातील हे गाव ! हिंदूंच्या कूपमंडुक वृत्तीमुळे उद्या भारत मुसलमानबहुल झाल्यावर काय होईल, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे !