|

बीजिंग (चीन) – भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १४ जुलैला चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय बैठकीत जयशंकर म्हणाले की, ऑक्टोबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. तेव्हापासून उभय देशांच्या संबंधांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती गुंतागुंतीची आहे. अशात भारत आणि चीन यांसारख्या मोठ्या शेजारी देशांमधील मुक्तसंवाद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
१. जयशंकर हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीन दौर्यावर आहेत. यंदा संघटनेच्या अध्यक्षपदी चीन असून भारताचा यासाठी पाठिंबा असल्याचेही जयशंकर म्हणाले.

२. जयशंकर यांचा ५ वर्षांत हा पहिलाच चीन दौरा आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र भारतात चीनला भारताचे राजदूत म्हणून जयशंकर हे सर्वाधिक काळ राहिलेले प्रशासकीय अधिकारी आहेत. ते ४ वर्षे ४ महिने आणि २ दिवस (१२ ऑगस्ट २००९ ते १४ डिसेंबर २०१३) चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहेत.
३. परराष्ट्रमंत्री १५ जुलैला तियानजिन येथे होणार्या शांघाय सहकार्य संघटनेच्या अंतर्गत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या वेळी ते चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचीही भेट घेणार आहेत. याआधी दोघे नेते ऑस्ट्रेलियाच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या जी-२० बैठकीच्या वेळी भेटले होते.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!