Sonia Gandhi Slams Israel : (म्हणे) ‘इराणवर आक्रमण करणे, हा इस्रायलचा दुटप्पीपणा !’

  • काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दैनिक ‘द हिंदू’मध्ये लिहिलेल्या लेखातून टीका

  • गाझा आणि आता इराण यांच्यावरील भारताचे मौन चिंताजनक असल्याचीही टीका

नवी देहली – इस्रायल स्वतः एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे; पण इराणकडे अण्वस्त्रे  नसतांनाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ‘द हिंदू’ दैनिकात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.

‘इराण भारताचा जुना मित्र आहे आणि अशा परिस्थितीत भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. गाझामध्ये होत असलेला विध्वंस आणि इराणमधील आक्रमण, यांविषयी भारताने स्पष्ट, दायित्वाने आणि भक्कम आवाजात बोलले पाहिजे. अजूनही फार विलंब झालेला नाही, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

इस्रायलने शांतता बिघडवण्याचे आणि आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले !

वाचा → सोनिया गांधी यांचा ‘द हिंदू’ दैनिकात प्रसिद्ध झालेला लेख –

या लेखात सोनिया गांधी यांनी पुढे म्हटले की,

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलने सतत शांतता बिघडवण्याचे आणि आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. (सोनिया गांधी यांनी कधी पाकिस्तानविषयी भारताच्या संदर्भात असे विधान केले आहे का ? किंवा लेख लिहिला आहे का ? – संपादक) हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे सरकार सतत अवैध वसाहती वाढवत आहे, अतिरेकी राष्ट्रवादींसमवेत काम करत आहे आणि द्वि-राज्य पर्याय पूर्णपणे नाकारत आहे. यामुळे पॅलेस्टिनी लोकांचे दुःख, तर वाढले आहेच; परंतु संपूर्ण प्रदेश दीर्घकालीन संघर्षाकडेही ढकलला गेला आहे. (सोनिया गांधी यांना पॅलेस्टिनी मुसलमानांचे लोकांचे दुःख दिसते; मात्र हिंदूंचे दिसत नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • कोणत्याही देशाला स्वतःचे रक्षण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. इराणच्या अणूबाँबमुळे इस्रायलचे स्वातंत्र्य संकटात येणार होते, त्यामुळेच इस्रायलने इराणवर आधीच कारवाई केली, तर काय चुकले ? प्रत्येक देशाने गांधीगिरी करून आत्मघात करून घ्यावा, असे सोनिया गांधी यांना वाटते का ?
  • देशात, तसेच पाकिस्तान, बांगलादेश येथील हिंदूंवर मुसलमानांकडून जेव्हा आक्रमणे होतात, तेव्हा काँग्रेसवाल्यांचे मौन चिंताजनक नसते का ? हिंदूंच्या रक्षणाविषयी काँग्रेसला कधी का बोलावेसे वाटत नाही ? काश्मिरी हिंदूंसाठी काँग्रेसने कधी अश्रू ढाळले आहेत का ?