
नागपूर – मुंबईवर २६ नोव्हेंबर २००९ चे आक्रमण झाले, तेव्हाच आतंकवाद आणि आतंकवाद्यांना पोसणारे ‘आका’ अर्थात् तेथील (पाकिस्तानचे) सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आम्ही जगापुढे केली होती; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून घोषित केली आहे. भारताची परराष्ट्र आणि संरक्षण विषयक भूमिका आता अधिक ठाम, निर्णायक अन् जागतिक स्तरावर प्रभावी झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. भारतीय सैन्याच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे या दिवशी देशाला संबोधित केले होते. या भाषणावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1922306874550166002
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक वेळी आक्रमण झाले की, पाकिस्तानचे सरकार ‘आमचा आतंकवादाशी काही संबंध नाही’, असे जगासमोर कांगावा करत होते; पण आता तसे होणार नाही. भारताने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे जगापुढे मांडली आहे. ही भूमिका केवळ भारताच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर जागतिक आतंकवादविरोधी लढ्यासाठीही एक निर्णायक टप्पा आहे. पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येक आक्रमणानंतर स्वतःचे दायित्व झटकण्याचा प्रयत्न केला; पण आता भारत अशा भ्रामक दाव्यांना भुलणार नाही. भारताच्या सामरिक क्षमतेचा आणि जागतिक दबाव निर्माण करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला आहे. भारतीय सैन्यदलाचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मोदी यांनाही धन्यवाद देतो. ‘आता केवळ पाकव्याप्त काश्मीवरच चर्चा होईल’, हेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !