
रावळपिंडी (पाकिस्तान) – भारताकडे कितीही शस्त्रे असली किंवा कितीही मोठे सैन्य असल्याचा त्याने दावा केला, तरी तो आपल्याला घाबरवू शकत नाही. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. आपले सैन्य आणि पाकिस्तानचे लोक कोणत्याही आक्रमणाविरुद्ध पोलादी भिंतीसारखे एकत्र उभे आहेत. पाकिस्तान स्वतःच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कुराणात म्हटले आहे की, लहान सैन्य अनेकदा मोठ्या सैन्यावर मात करते, अशी हास्यास्पद विधाने पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी येथे केले. त्यांनी ही वक्तव्ये भारतीय ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आक्रमणात घायाळ झालेल्या पाकिस्तानी सैनिकांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर केली.
संपादकीय भूमिकाभारत पाकला घाबरवू शकत नाही, तर नष्टच करू शकतो, इतकी त्याच्यात क्षमता आहे. आता या क्षमतेचा वापर भारताने करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! |
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड