
हरिद्वार (उत्तराखंड) – पहलगाममधील आतंकवादी आक्रमणावरून योगऋषी रामदेवबाबा यांनी पाकला ‘एक अपयशी राष्ट्र’ संबोधत लवकरच त्याचे अनेक तुकडे होतील आणि भविष्यात कराची अन् लाहोर येथे सनातन गुरुकुलांची स्थापना केली जाईल, असे म्हटले आहे.
🚨 "Will have to build next Gurukuls in Karachi & Lahore" — Baba Ramdev
📉 Predicts Pakistan's collapse citing unrest in Balochistan & PoK
🇮🇳 Envisions Sanatan resurgence beyond borders!#IndianArmy #IndiaPakistanWar #Kashmir
VC: @UpnewsUp pic.twitter.com/l1NsXkuEhT— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2025
रामदेवबाबा पुढे म्हणाले की, पाकमधील पश्तून आणि बलुचिस्तान यांसारख्या भागातील लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती उघड होते. पाकव्याप्त काश्मीरची स्थितीही फार वाईट आहे. पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या स्थितीत नाही. सनातन संस्कृतीचा उल्लेख करतांना रामदेवबाबा यांनी भारतीय राज्यघटना आणि सनातन धर्म या दोघांनाही समान महत्त्व देण्याविषयीही सांगितले. राष्ट्रीय धर्म आणि वैदिक धर्म सर्वोच्च असल्याचे सांगून त्यांनी देशवासियांना एकता राखण्याचे आवाहन केले.