ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी !

पालघर येथे विश्‍व हिंदु परिषदेचा स्तुत्य प्रयत्न !

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

पालघर – ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदु धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. विश्‍व हिंदु परिषदेने यामध्ये साहाय्य केले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरुष यांचा समावेश आहे.

त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले आहे. त्यांपैकी विक्रमगड तालुक्यातील १७ जणांची हिंदु धर्मात घरवापसी झाली. यांमध्ये ५ कुटुंबांचा समावेश असल्याची माहिती पालघर जिल्ह्यातील नरेश मराड यांनी दिली आहे. धर्मांतराच्या आमिषाला भुललेल्या हिंदूंचा पालघरमधील विठ्ठल मंदिराच्या समितीने त्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत करण्यात आले.