परमेश्वराकडे काहीही न मागता त्याला सर्वस्व दिल्यास ईशकृपेची प्रचीती येईल !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !

प.पू. दादाजी वैशंपायन

‘वर्तमान आणि भविष्य काळासाठी, तसेच भीती वाटणारी संकटे अन् होणारा अनर्थ हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडे कसलीही मागणी करू नका. कोणतीही अट न घालता आणि काहीही हातचे राखून न ठेवता तुम्ही परमेश्वराला सर्वस्व देऊन टाका. यामुळे तुमच्यातील सर्वकाही परमेश्वराच्या मालकीचे होईल आणि ‘तुम्ही अहंकार करावा’, असे काहीच उरणार नाही. असे झाले की, आज ना उद्या ईशकृपेची प्रचीती निश्चितच येईल !’ (१३.७.२००८)