लोखंड तापलेले असून अखंड भारत घडवण्यासाठी जोरात प्रहार करा !

सध्या बांगलादेशामध्ये चालू असलेला हिंसाचार, जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे (विशेषतः १ कोटी ३१ लाख हिंदूंच्या मालमत्तेची) आदी चालू असल्याने तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात पळून यावे लागले आहे. बांगलादेश या नीच देशासह त्याचा ‘रिमोट कंट्रोल’ (नियंत्रक) असलेल्या पाकिस्तानसह कह्यात घेण्याची देवाने चांगली संधी दिलेली आहे.

१. जगातील कोणत्याही भागातील हिंदूंचे रक्षण करणे हे पवित्र कर्तव्य !

वास्तविक भारत हे नैसर्गिकरित्या वसतीस्थान असलेल्या भारतातील १२५ कोटी हिंदूंचे जगातील कोणत्याही भागात असलेल्या हिंदूंना धोका असेल, तर त्यांची सुटका करायला जाणे, हे कायदेशीर, नैतिक आणि पवित्र कर्तव्य आहे. सध्या बांगलादेशामध्ये रहाणार्‍या हिंदूंचे जीव आणि मालमत्ता यांना पुष्कळ प्रमाणात धोका आहे. निःशस्त्र आणि भोळ्याभाबड्या हिंदूंवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना एक क्षणही न दवडता नष्ट केले पाहिजे. बांगलादेशामधील हिंदूंच्या नरसंहाराला अप्रत्यक्षरित्या मान्यता देणारे तथाकथित मानवी हक्कांचे रक्षण करणारे, राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्याचा दावा करणारे यांच्यामध्ये दुटप्पी अन् संशयास्पद वागणूक दिसून येत आहे. भारतातील विरोधी पक्षातील बहुतांश सदस्यांनी बांगलादेशामधील भीषण स्थितीविषयी शांतता पाळली आहे. याउलट काही पक्षांच्या नेत्यांनी ‘लोकांच्या इच्छेमुळे शेख हसीना यांना ढाका शहर सोडून पळून जावे लागले’, असे म्हणण्यास प्रारंभ केला आहे. या कालावधीत जमावाच्या हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या हिंदूंसाठी ढाळण्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रूच नाहीत.

अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय

२. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केंद्र सरकारच्या मर्यादा लक्षात घेऊन सक्रीय व्हावे !

बांगलादेशामधील घडामोडी, म्हणजे वर्ष १९७१ मध्ये भारताने बांगलादेशाची निर्मिती केली, त्याच्याशी थेट संबंध असलेली शेख मुजिबूर रहेमान यांची मुलगी शेख हसीना हिच्याशी तेथील विरोधकांचे शत्रूत्व आहे आणि बांगलादेशाचे पिता शेख मुजिबूर रहेमान यांना असलेल्या विरोधाचे प्रकटीकरण त्यांचा पुतळा नष्ट करण्यावरून दिसून येते. त्यामुळे ‘त्या देशाचा हा अंतर्गत प्रश्न आहे’, असे म्हणून तो बाजूला ठेवता कामा नये. आज बांगलादेशातील स्थिती प्रचंड प्रमाणात स्फोटक आहे. हिंदूंच्या बाजूने असलेले भारतातील केंद्र सरकार कणखर असले, तरी बांगलादेशामधील हिंदूंना आश्वासन देण्यासाठी त्वरित कृती करण्यासाठी त्याला काही राजकीय मर्यादा आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि इतर समविचारी स्वयंसेवी संस्था यांना या मर्यादा नाहीत. त्यामुळे या संस्थांनी सक्रीयपणे आणि ठामपणे त्वरित कृती केली पाहिजे.

३. जिहादी घटकांवर आघात करण्याची हीच योग्य वेळ !

भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील जिहादी घटकांवर आघात करण्याची खरोखर हीच योग्य वेळ आहे. आज इस्लामी जगतापैकी ८० टक्के लोक युद्धजन्य स्थितीत अडकले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशही जळत आहे अन् सध्या अमेरिका नोव्हेंबर मासात येणार्‍या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे अमेरिकेला बांगलादेश किंवा पाकिस्तान यांच्याशी खेळ करत बसणे परवडणार नाही. इतर युरोपियन राष्ट्रे आणि रशिया, चीन यांनी ‘आम्ही बांगलादेश अन् पाकिस्तान यांचे तारणहार आहोत’, ही भूमिका व्यक्त करण्याची शक्यता नाही; कारण त्यांचे युक्रेन, इराण, तुर्कीये, सीरिया, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल यांच्याशी  असलेल्या गोंधळात इतर इस्लामी राष्ट्रासंबंधी दावे आहेत.

४. भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर लष्करी कारवाई करा !

थोडक्यात सांगायचे झाले, तर बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही जिहादी राष्ट्रांवर भारताने लष्करी कारवाई करून कह्यात घेण्याची वेळ आली आहे. ही कारवाई करण्याआधी ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, हे अधिकृतरित्या घोषित करून देशात आणीबाणी जारी करावी. यासह संरक्षण खात्याचे शिष्टाचार किंवा नियम लागू करून ठामपणे आणि परिणामकारकरित्या जिहादी शक्ती अन् राष्ट्रविरोधी घटक यांना हाताळावे, तसेच संसद तात्पुरती विसर्जित करावी. असे केल्यानंतर हिंदुविरोधी गट किंवा राष्ट्रविरोधी शक्ती आरडाओरडा करून टोकाला जाऊन सर्वत्र जातीय हिंसाचार करतील, हे खरे आहे; परंतु धर्माकरता आणि राष्ट्राचे सार्वभौमत्व अन् अखंडता यांसाठी केलेल्या त्यागापेक्षा कोणताही त्याग मोठा नाही. अखंड भारताची स्थापना करण्यासाठी होणार्‍या धर्मयुद्धामध्ये सामील होणे, हा हिंदूंसाठी आनंदाचा क्षण असेल.

– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.