
राजापूर – तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ परिसरात इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना अश्मयुगीन कालखंडाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. या शोधामुळे तालुक्यातील प्रागैतिहासिक वारशात आणखी एका महत्त्वपूर्ण स्थळाची भर पडली आहे. पन्हाळे माळवाडी परिसरातील जांभ्या दगडाच्या सड्यावर हे कातळशिल्प आढळून आले.
कोकणात आढळलेली कातळशिल्पे ही प्रागैतिहासिक मानवाच्या जीवनशैली, श्रद्धा, निसर्गाशी असलेले नाते आणि ज्ञानपरंपरेची प्रचीती देणारी मानली जातात. पन्हाळे तर्फे सौंदळ येथील ही मानवाकृती देखील अशाच प्राचीन वारशाचा भाग असण्याची शक्यता असून या स्थळाचा पुरातत्त्वीय आणि शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
माळवाडी परिसरातील हे कातळशिल्प अनुमाने ४ फूट उंच आणि ३ फूट रुंद असून ही मानवाकृती दोन्ही हात बाजूला पसरलेल्या अवस्थेत कोरलेली आहे. दूरून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची सावलीच कातळावर उमटली असल्याचा भास या आकृतीमुळे होतो. या कातळशिल्पाचा शोध लागल्यानंतर परिसराची पहाणी, स्वच्छता आणि प्राथमिक दस्तऐवजीकरणाचे काम करण्यात आले. या संशोधन मोहिमेत पराग पारकर, वरद पवार, वरुण जाधव, यश इंगळे आणि समर्थ आबवले यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री