Bangladesh Maulana : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांमागे धर्मांध मौलानांचाही हात !

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

मौलाना हसन जमील व मौलाना जुनैद अल हबीब

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारामागे बांगलादेश सरकारसमवेतच धर्मांध मौलानांचाही हात आहे. हे मौलाना त्यांच्या भाषणांत हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवत आहेत. ते बांगलादेशाला केवळ ‘मुसलमानांचे राष्ट्र’ म्हणत असून भारतावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहात आहेत.

(म्हणे) ‘देहलीतील लाल किल्ल्यावर इस्लामी ध्वज फडकावू !’

मौलाना हसन जमील हा कट्टर हिंदुविरोधी इस्लामी धर्मगुरु आहे, जो भारताविरुद्ध गरळओक करत आहे. मौलाना हसन जमील याचे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आणि लाल किल्ल्यावर इस्लामी ध्वज फडकवण्याचे स्वप्न आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याची धमकीही त्याने दिली आहे. हसन जमील म्हणतो की, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. अल्लाने सांगितले आहे की, तुमचे शत्रू नष्ट होतील. आम्ही यावर विश्‍वास ठेवतो. भारत आणि इस्रायल यांचा विनाश निश्‍चित आहे. आम्हाला शस्त्रांंची आवश्यकता नाही. आम्ही अल्लाची शपथ घेतो. आम्ही नेहमी स्वप्न पहातो की, एक दिवस आम्ही देहलीतील लाल किल्ल्यावर इस्लामी ध्वज फडकावू. मुसलमान कुणाच्या अण्वस्त्रांवर विश्‍वास ठेवत नाहीत, तर ते केवळ अल्लावर विश्‍वास ठेवतात. आम्ही लढू आणि आम्ही भारत जिंकू.

वर्ष २०४० नंतर बांगलादेशात मुसलमानांखेरीज कुणीच रहाणार नाही !

हसन जमील हे हिंदुविरोधी विष उधळणारे एकटे नाहीत. मौलाना नूर हसन हाही बांगलादेशातून हिंदूंना संपवण्याविषयी बोलत आहे. बांगलादेशात मुसलमानांखेरीज कुणालाही राहू द्यायचे नाही, अशी योजना आहे. नूर हसन म्हणाला की, वर्ष २०४० नंतर बांगलादेशात इस्लामखेरीज कुणीही उरणार नाही. तुमचा धर्म पालटा. अल्लाची इच्छा असेल, तर बांगलादेश हा पूर्णपणे इस्लामी देश असेल.

(म्हणे) ‘मुसलमानांच्या सणांमध्ये हिंदू सहभागी होत नसतांना तुम्ही दुर्गापूजेला का जाता ?’

मौलाना जुनैद अल हबीब याने म्हटले आहे की, आजपर्यंत एकही हिंदू मुसलमानांच्या सणांच्या वेळी दिसला नाही. एकाही हिंदूने तुमच्यासमवेत कधी उपवास केलेला नाही. ईदच्या नमाजपठणाला हिंदू कधीच आला नाही. तुमच्यासमवेत  शुक्रवारच्या प्रार्थनेला हिंदू कधीच आला नाही; कारण ‘हे सर्व मुसलमानांचे आहे’, असे हिंदु मानतात; पण मुसलमान असूनही तुम्ही हिंदूंच्या दुर्गापूजेला का जाता ?, तुम्ही लाज सोडली आहे का ? आम्ही भारताचा लाल किल्ला बांधला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आमचे रक्त सांडले. भारत देश आपला आहे. तुम्ही देशभक्तीच्या घोषणा देता. मंत्री आमचा आवाज ऐकू शकले नाहीत. सत्तापालट व्हायला वेळ लागणार नाही.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील मौलाना असे असतील, तर भारताचे मौलाना मागे रहातील का ? ते मशिदींतून मुसलमानांना काय शिकवत आहेत ?, याकडे हिंदूंचे लक्ष आहे का ?