Decrease In Tribal Population :  बांगलादेशी घुसखोर मुसलमानांमुळे झारखंडमधील आदिवासींच्या लोकसंख्येत १० टक्क्यांची घट !

  • भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी लोकसभेत दिली चिंताजनक माहिती !

  • केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी !

नवी देहली – झारखंडमधील गोड्डा येथील भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी आदिवासींच्या घटत्या लोकसंख्येचे सूत्र संसदेत उपस्थित केले. बांगलादेशातून झारखंडमध्ये घुसखोरी केलेल्या मुसलमानांमुळे तेथील आदिवसींची लोकसंख्या १० टक्क्यांनी घटली असल्याचे खासदार डॉ. दुबे यांनी या वेळी सांगितले.

खासदार डॉ. दुबे पुढे म्हणाले की,

१. बांगलादेशी मुसलमान आदिवासी महिलांशी करत आहेत विवाह !

बांगलादेशातून होणारी घुसखोरी सातत्याने वाढत आहे. बांगलादेशी घुसखोर मुसलमान झारखंडमधील आदिवासी महिलांशी विवाह करत आहेत. लोकसभा निवडणूक लढवणार्‍या महिला आदिवासी कोट्यातून लढतात. या महिलांचे पती मुसलमान आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पती मुसलमान आहेत. १०० आदिवासी प्रमुख आदिवासी महिला आहेत; मात्र त्यांचे पती मुसलमान आहेत.

२. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे सरकार निष्क्रीय !

मी ज्या संथाल परगणामधून आलो आहे, तेथे जेव्हा झारखंड बिहारपासून वेगळे झाले, तेव्हा आदिवासींची लोकसंख्या ३६ टक्के होती. आज आदिवासींची लोकसंख्या २६ टक्के आहे. १० टक्के आदिवासी कुठे गायब झाले ?, याविषयी या सभागृहात कधीही चर्चा होत नाही, तेथे ‘व्होट बँके’चे राजकारण चालते. झारखंड राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार आहे. सरकार या संदर्भात काहीही कारवाई करत नाही.

३. मुसलमानांच्या लोकसंख्येत ११७ टक्क्यांची वाढ !

येथे नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकसंख्या १५ ते १७ टक्क्यांनी वाढते. मी ज्या लोकसभेतून निवडून येतो, त्या मधुपूरमध्ये जवळपास २६७ मतदान प्रभागांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या ११७ टक्क्यांनी वाढली आहे. संपूर्ण झारखंडमध्ये अशा किमान २५ विधानसभेच्या जागा आहेत, जिथे लोकसंख्या १२३ टक्क्यांनी वाढली आहे. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे.

हिंदूंचा नाश होण्यापूर्वी बिहार, बंगाल आणि झारखंड या राज्यांतील काही जिल्ह्यांचा एकत्रित केंद्रशासित प्रदेश करा !

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील तारानगर इलामी आणि दारापाडा येथील दंगलीचे सूत्र उपस्थित करून खासदार डॉ. दुबे म्हणाले की, ममता बॅनर्जी सरकारचे पोलीस आणि बंगालच्या मालदा अन् मुर्शिदाबाद येथील मुसलमान येऊन आमच्या ठिकाणच्या लोकांना पळवून लावत आहेत. गावामागून गावे रिकामी होत आहेत. हे अतिशय गंभीर आहे. माझे म्हणणे चुकीचे असेल, तर मी त्यागपत्र द्यायला सिद्ध आहे. संपूर्ण बंगाल, मुर्शिदाबाद आणि मालदा येथून लोकांनी येऊन हिंदूंविरोधात गुन्हे केले आहेत. झारखंड पोलिसांना कोणतेही काम करता येत नाही.

मुसलमानांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता भारत सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. मालदा, मुर्शिदाबाद, किशनगंज, अररिया, कटिहार आणि संपूर्ण संथाल परगणा केंद्रशासित प्रदेश बनवा,अन्यथा हिंदू नष्ट होतील. तेथे विधानसभेची समिती पाठवा आणि या समितीत अधिकाधिक तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा समावेश करा.

संपादकीय भूमिका

  • ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ?
  • आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?