मोहरमची मिरवणूक हिंदूबहुल भागातून नेण्याला विरोध केल्यावर धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

  • बरेली (उत्तरप्रदेश) येथील गौसगंज भागातील घटना

  • ५ हिंदु घायाळ, एकाची प्रकृ चिंताजनक

प्रतिकात्मक छायाचित्र

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मोहरमची मिरवणूक चुकीच्या मार्गाने काढण्याला हे हिंदू विरोध करत होते. ही मिरवणूक प्रतिवर्षी काढण्यात येणार्‍या मार्गावरून जाण्याऐवजी हिंदूबहुल भागातून नेण्यात येत होती. तेव्हा हिंदूंनी त्यास विरोध केला आणि सांगितले की, मिरवणुका पूर्वी ज्या मार्गाने जात होत्या, त्याच मार्गांचा वापर करावा. यानंतर १०० हून अधिक धर्मांधांनी हिंदूंवर त्यांच्या घरात घुसून आक्रमण केले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस पोचल्यावर धर्मांध मुसलमान पळू लागले. यांतील १० जणांना पकडण्यात आले आहे. (एरव्ही हिंदूंच्या मिरवणुकांच्या वेळी पोलीस संरक्षण देणारे पोलीस मोहरमच्या मिरवणुकांच्या वेळी कुठे लपले होते ? उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी चूक होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • कधी हिंदूंच्या मिरवणुका मुसलमानबहुल भागातून नेल्या म्हणून, तर कधी मुसलमानांच्या मिरवणुका हिंदूहबहुल भागातून नेऊ दिल्या नाहीत म्हणून धर्मांध मुसलमान नेहमी हिंदूंवरच आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !
  •  ‘भारतात मुसलमान नाही, तर हिंदु असुरक्षित आहेत’, असे एकही राजकीय पक्ष म्हणत नाही, हे लक्षात घ्या ! भारतात हिंदूंना कुणीही वाली नाही, हे पहाता हिंदूंनीच आता संघटित होणे आवश्यक आहे !