Hindus  fleeing From Jharkhand : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक : हिंदूंचे पलायन चालू !

  • झारखंड बनले दुसरे बांगलादेश !

  • पाकूर गावातील घटना : बांगलादेशी घुसखोरांची दहशत वाढली !

रांची (झारखंड) – राज्यातील पाकूरमध्ये हिंदूंच्या घरांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाकूरमध्ये एका मुसलमान मुलाने हिंदु मुलीचा अश्‍लील व्हिडिओ सर्वत्र प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हिंदूंनी या घटनेचा निषेध करत मुलाला मारहाणही केली. या घटनेने संतप्त झालेल्या मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर विटा आणि दगड यांचा जोरदार मारा केला. या घटनेत अनेक हिंदू गंभीर घायाळ झाले, तर अनेकांच्या घरांची हानी झाली आहे.

या वेळी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. त्यात ३ पोलीस घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व गोष्टींमुळे तेथील हिंदू परिसर सोडून पळून जाण्याच्या सिद्धतेत असल्याचा भाजपचा दावा आहे. पाकूर गाव ओसाड पडत आहे. या परिस्थितीसाठी भाजपच्या नेत्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना उत्तरदायी धरले आहे. या प्रकरणी हेमंत सोरेन सरकारच्या मौनावरही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

काश्मीर, बंगाल आणि केरळ यांनंतर आता झारखंडही हिंदूंच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे. यावर वेळीच आवर घातला गेला नाही, तर भारताचे इस्लामिस्तान करण्याचे वर्ष २०४७ चे ध्येय साध्य करण्यास धर्मांधांना बळ मिळेल !