वरळी अपघातप्रकरणी मिहीर शहा याच्या कोठडीत ३० जुलैपर्यंत वाढ !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – वरळी येथील अपघातप्रकरणी प्रमुख आरोपी मिहीर शहा याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ३० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १६ जुलैपर्यंतच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

मिहीर याने ७ जुलै या दिवशी मद्यधुंद अवस्थेत ‘बी.एम्.डब्ल्यू.’ कार चालवत असतांना दुचाकीवरून चाललेल्या एका दांपत्याला उडवले होते. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर २ दिवस मिहीर लपून बसला होता. त्याला लपवण्यात साहाय्य केल्याप्रकरणी त्याची आई आणि २ बहिणी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.