
वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘आतंकवादामुळे पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, असा भारताचा नेहमीच आग्रह आहे. याकडे पहाता भारत आणि पाकिस्तान यांच्याशी अमेरिकेचे संबंध कुठल्या स्तरावर आहेत ?’, असा प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘जगातील कोणताही देश कुठेही आतंकवादाचा निषेध करेल, असा आम्हाला विश्वास आहे. शेजार्यांशी अधिक सकारात्मक संबंध निर्माण करणार्या प्रत्येक देशाचे अमेरिका स्वागत करते; पण शेवटी ते भारत आणि पाकिस्तान यांच्यावर अवलंबून आहे की, ते आतंकवादाकडे कसे पहातात ?’
पटेल पुढे म्हणाले की, भारत हा असा देश आहे, ज्याच्यासमवेत आम्ही अनेक क्षेत्रांत आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत. विशेषत: हे संबंध आमचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याशी संबंधित आहे.
संपादकीय भूमिकाजगातील काही देश आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेले आहेत आणि ते वरून आतंकवादाचा निषेध करण्याचे नाटक करतात. अशांंना आता जगाने उघडे पाडण्याची आवश्यकता आहे, असे अमेरिका कधी सांगेल का ? |
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif