२ दिवसांपासून वातानुकूलित यंत्रणा बंद !

कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील प्रकार !

कल्याण – कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना उकाड्याचा पुष्कळ त्रास होत आहे. या प्रकरणी प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

शीत यंत्रणा बंद असल्यास प्रवाशांना सूचना करणारे एक लाल बटण दाबावे लागते; मात्र तसे करूनही मोटरमन आणि गार्ड यांच्याकडून त्याची नोंद घेतली जात नाही. अशा बिकट स्थितीतच गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

संपादकीय भूमिका 

रेल्वे प्रशासन ही समस्या कधी सोडवणार ? प्रवाशांची गैरसोय करणार्‍या रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाच यातून उघड होतो.