अपरिग्रहाचे महत्त्व

हावरटपणाची किंवा संचयाची वृत्ती व्यावहारिक जीवनातदेखील आत्मघात घडवून आणते. श्रीमंतीचा लोभच माणसाला चोरांच्या भक्ष्यस्थानी आणतो. आमिषाच्या प्रलोभनामुळे मासा आकड्यात अडकतो, तसेच मधमाशी संचयाच्या प्रवृत्तीमुळेच एक दिवस जाळली जाते. अपरिग्रह (संग्रह न करणे) भौतिक तथा आध्यात्मिकदृष्ट्या तारक ठरतो.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)