प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

ध्रुव अरण्यात जातो. त्याला काहीच ठाऊक नसते. त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते, ‘देव अरण्यात असतो.’ वाघ दिसल्यावर ध्रुव त्याला विचारतो, ‘अरे बाबा, तू देव पाहिलास का ?’ वाघ खाईल म्हणून वाघाचे त्याला भय वाटत नाही. वाघ जवळ येतो मान हलवतो, काही तरी करतो अणि निघून जातो. तोच प्रश्न अजगराला विचारतो, सापाला विचारतो, उंदराला विचारतो. भय कुठे आहे. त्याला ठाऊकच नाही वाघ कोण आहे ? ‘ज्याला भय नाही निर्भय आहे तो.’ अद्वैतात फक्त निर्भयता आहे. दुसरा आला की, भय आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !