वक्फ बोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

आणखी किती भूमी बळकावल्यावर हिंदूविरोधी आणि राष्ट्रविघातक असणारा वक्फ बोर्डाचा कायदा रहित करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे ?

कोणत्याही देशात मुसलमान जेव्हा अल्पसंख्य असतात, तेव्हा ते नेहमी ‘आम्ही या देशात असुरक्षित आहोत’, अशी धादांत खोटी ओरड करतात. या मुसलमानांना कितीही पैसा, प्रतिष्ठा आणि पदे दिली, तरी त्यांची असुरक्षिततेची ओरड काही संपत नाही. अमाप पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळूनही ‘खान’ आडनावाच्या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना आणि त्यांच्या हिंदु बायकांना हा भारत ‘असुरक्षित’ वाटू लागतो ! मुळात कोणत्याही भूभागात मुसलमान अल्पसंख्य असला, तरी तो कधीच असुरक्षित नसतो. उलट त्याची जिहादी वृत्ती आणि कृती यांमुळे इतर बहुसंख्य असणारा अन्य धर्मीय समाज कायमच असुरक्षित असतो. आज जिहादी वृत्तीच्या मुसलमांनामुळे सारी मानवजात असुरक्षित झाली आहे.

या जिहादी मुसलमांनामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची आणि त्यात सारी मानवजात भस्म होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

२४ मार्च २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारताचे उपराष्ट्रपतीपद १० वर्षे भोगूनही हिंदुद्वेषी गरळओक करणारे हमीद अन्सारी, वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानची मागणी होणे आणि विस्थापनात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होणे, पाकमध्ये गेलेल्या मुसलमानांची संपत्ती मुसलमानांनाच मिळण्यासाठी ‘वफ्फ बोर्डा’ची स्थापना होणे,  हिंदुद्वेष्ट्या नेत्यांकडून मुसलमान हिताचे निर्णय, वक्फ बोर्डाला अमर्याद आणि निरंकुश अधिकार, तसेच ‘एंटिलिया’वरही अधिकार सांगणारे वक्फ बोर्ड’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

मागील भाग :https://sanatanprabhat.org/marathi/776897.html

११. प्राचीन मंदिरांच्या जागा बळकावणारे बकासुरापेक्षाही मोठे झालेले वक्फ बोर्ड !

श्री. शंकर गो. पांडे

वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या अमर्याद अधिकारामुळे या बोर्डाला भारतातील किती भूमी बळकावू आणि किती नाही, असे झाले आहे. ऑगस्ट २००३ मधील तमिळनाडू या राज्यातील ही घटना आहे. तमिळनाडूमधील अनंगकौंडणपुथुर या गावातील एका हिंदूने त्याची भूमी विक्रीसाठी काढली होती; पण तमिळनाडूच्या वक्फ बोर्डाने यावर आक्षेप घेऊन ‘त्या खेड्यातील संपूर्ण भूमी ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे’, असे घोषित केले. विशेष म्हणजे त्या गावात १४०० वर्षापूर्वी बांधलेले एक प्राचीन हिंदु मंदिर आहे. त्या मंदिराच्या जागेवरही वक्फ बोर्डाने अधिकार सांगितला आहे. मुसलमान धर्माची स्थापना होऊन आता कुठे १४०० वर्षे पूर्ण होत आहेत. मग वक्फ बोर्ड त्या मंदिराच्या जागेवर त्याचा हक्क कसा काय सांगू शकतो ? पण भूमी बळकावण्याची जी धुंदी या वक्फ बोर्डावर चढली आहे, त्या धुंदीमुळे त्यांना या विसंगतीचे भान राहिले नाही.

१२. वक्फ बोर्डाचे सारे सदस्य मुसलमान असल्याने ते हिंदूला कधी तरी न्याय देतील का ?

ही वक्फ बोर्डाची समिती अशी आहे की, या समितीवर आमदार, खासदार, वकील, न्यायाधीश, स्कॉलर (विद्वान), प्रशासकीय अधिकारी, ७ न्यायिक सदस्य हे सर्व मुसलमानच असतात. त्यामुळे अशा समितीसमोर हिंदूंनी त्यांची तक्रार भक्कम पुराव्यासह जरी प्रविष्ट (दाखल) केली, तरी हिंदू किंवा अन्य धर्मीय तक्रारदाराला न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नसते. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी या वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिल्यामुळे भारतातील भूमी बळकावण्यासाठी वक्फ बोर्डाला जणू मोकळे रान मिळाले आहे.

अनेक गावांतील पडिक भूमी, गायराने, खेळाची मैदाने, बाग यांच्यासाठी ठेवलेल्या जागा यावर वक्फ बोर्डाने अधिकार सांगून त्या बळकावल्या आहेत. या जागेवर मग घरे, थडगे, दर्गे उभारले जातात. गावातील मुसलमान एकजूट होऊन गावच्या तलाठ्याला ७/१२ च्या उतार्‍यावर त्या बळकावलेल्या भूमीवर वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍याची नोंद घेण्यास सांगतात. तलाठी एकटा असतो. त्याला गावातील हिंदूंची आणि शासनाची साथ मिळत नाही. त्यामुळे तो मुसलमान समाजाशी भांडू शकत नाही. कायदेशीर कार्यवाही करण्याच्या आणि न परवडणार्‍या भानगडीत तो पडत नाही अन् शेवटी तो ७/१२ वर वक्फ बोर्डाच्या मालकीची नोंद घेतो.

मुसलमानांनी साम, दाम, दंड आणि भेद या मार्र्गांनी अनेक देशांच्या भूमी बळकावल्या आहेत. त्यामुळे केवळ अरबस्तान आणि त्यातही अल्प भूभागापुरता सीमित असणार्‍या मुसलमान धर्माने अल्पावधीतच जगात ५७ इस्लामी राष्ट्रांची निर्मिती केली आहे.

१३. भारतच इस्लाममय करायचा असल्याने भूमी बळकावण्याचा प्रयत्न !

धार्मिक आधारावर मुसलमानांनी वर्ष १९४७ मध्ये भारताचेही विभाजन करून २ इस्लामी राष्ट्रांची निर्मिती केली; पण एवढ्यावरच हा समाज संतुष्ट नाही. त्यांना एक तर पूर्ण भारतच इस्लाममय करायचा आहे किंवा लोकसंख्येच्या बळावर भारताचे परत विभाजन करून अजून काही इस्लामी राष्ट्रांची निर्मिती करायची आहे. त्यासाठी भारतातील बळकावता येईल तेवढी भूमी बळकावण्याचा उद्योग मुसलमान समाजाकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चालू आहे.

१४. प्रत्येक गावातील चारही दिशांच्या भूमी धर्मांधांच्या कह्यात !

धर्मांधांनी प्रत्येक गावातील चारही दिशांकडील भूमी एक तर बळकावलेल्या आहेत किंवा विकत घेतल्या आहेत. प्रत्येक महामार्गावरच्या भूमीवर मोठमोठ्या हॉटेल्सचे बांधकाम केले आहे. आसाम, नेपाळ यांसारख्या सीमावर्ती भूभागावर मोठ्या मशिदी आणि मदरसे यांचे बांधकाम केले आहे. संपूर्ण भारतातील रेल्वेच्या आजूबाजूच्या पडिक भूमी बळकावून तेथे प्रचंड प्रमाणात मुसलमान वस्त्या बसवल्या असून मशिदी आणि मदरसे बांधले आहेत. रेल्वे रुळाभोवतीच्या या मुसलमान वस्त्या भविष्यात भारताच्या सुरक्षेसाठी पुष्कळ धोकादायक ठरणार आहेत. मुसलमानांचे हे अतिक्रमण हटवणे, ही एक जटील समस्या बनली आहे. एखाद्या हिंदुत्वनिष्ठ शासनाने हे अतिक्रमण उठवण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुद्वेष्टे नेते लागलीच मुसलमानांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरतात आणि अतिक्रमण हटवण्यास विरोध करतात.

१५. हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांकडून घुसखोरांना भूमी देण्यात येणे

मुसलमानांनी अवैधपणे बळकावलेल्या भूमीवर मशिदी, दर्गे आणि मदरसे तर उभारले जातातच; पण भारतात अवैध घुसलेल्या बांगलादेशातील घुसखोरांना अन् म्यानमारमधून रोहिंग्यांनाही वसवले जाते. देहली आणि जम्मू-काश्मीर येथे अशा लाखो रोहिंग्यांना वसवण्यात आले आहे. त्यांना हिंदुद्वेष्ट्या शासनकर्र्त्यांकडून वीज, पाणी, अन्नधान्य अशा सोयीसवलती पुरवल्या जात आहेत.

१६. गड-दुर्गावरही आक्रमण करून धर्मांधांनी भूमी बळकावणे

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक, क्रूर आणि धर्मांध परकीय आक्रमकांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती अन् जे गड-दुर्ग त्यांना प्राणाइतकेच प्रिय होते, त्या गड-दुर्गांची सध्या काय अवस्था आहे ? अनेक गड-दुर्गांवर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे मोठ्या प्रमाणात घरे, मशिदी, दर्गे बांधले आहेत. पुरातत्व विभागाने कधी या अतिक्रमणाकडे लक्ष दिले नाही. केव्हा केव्हा तर ‘हा पुरातत्व विभागाचा हत्ती कशासाठी बिनकामी पोसला जातो ?’, असा प्रश्न मला पडतो.

आमच्या भ्रष्ट नोकरशाहीविषयी काय बोलावे ? २-४  सहस्र रुपयांसाठी ही नोकरशाही बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना भारतात अवैधपणे घुसू देते; त्यांना मतदान, आधारकार्ड, शिधापत्रिका उपलब्ध करून देते; घुसखोरांनी अतिक्रमण करून बांधलेल्या घरांना वीज, पाणी अशा अनेक सोयीसवलती उपलब्ध करून देते. गड-दुर्गावर अतिक्रमण करून बांधलेली घरे आणि मशिदी यांना अशा भ्रष्ट नोकरशाहीनेच वीज, पाणी उपलब्ध करून दिले आहे अन् हिंदु समाजाविषयी काय बोलावे ? शतकातून एखादा हिंदुहिताचा कळकळ असणारा हिंदु नेता सदैव झोपेत असणार्‍या हिंदूंना जीवापाड प्रयत्न करून जागृत करतो, हिंदु समाज तेवढ्यापुरता जागा होतो; पण तो हिंदु नेता काळाआड गेला की, हिंदु समाज परत कुंभकर्णी निद्रेच्या अधीन होतो. छत्रपती शिवरायांनी हिंदु समाजाला एकदा जागृत केले होते; पण छत्रपती शिवरायांच्या अवताराची समाप्ती होताच हिंदु समाज परत गाढ झोपी गेला. जातीपातीत विभागला गेला, स्वार्थात बुडाला, असंघटित झाला आणि ‘मला काय त्याचे ?’, ही आपली नेहमीची आत्मघातकी वृत्ती हिंदु समाजाने धारण केली.

परिणामतः मुसलमान समाज गडदुर्गांवर अतिक्रमण करत असतांनाही हिंदु समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले. तो अलिप्त वृत्ती धारण करून चूप राहिला. गडदुर्गांवरचे मुसलमानांचे अतिक्रमण हटवणे, ही आता एक जटील समस्या झाली आहे; कारण ‘हे अतिक्रमण हटवतो’, असे म्हटले, तर हिंदुद्वेष्ट्या संघटना आणि नेते मुसलमानांची बाजू घेण्यासाठी पुढे येतील, हे निश्चित. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या अफझलखानाच्या कबरीच्या नावाने मुसलमानांनी वनभूमीवर केलेले अतिक्रमण उखडून टाकण्याची मागणी जेव्हा काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली होती, तेव्हा धर्मवीर संभाजी महाराजांचे कुंकू लावून स्थापन झालेल्या एका तथाकथित संघटनेनेच त्याला विरोध केला होता ! (अफझलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण वर्ष २०२३ मध्ये शासनाने हटवले आहे. – संपादक)

१७. ‘देशातील सर्व संसाधनांवर  पहिला हक्क मुसलमानांचा’ हे कृतीत आणणारे काँग्रेसचे मनमोहनसिंह !

मुसलमानांच्या भूमी बळकावण्याच्या वृत्तीला हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी संमत केलेल्या वक्फ बोर्डाच्या कायद्यामुळे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाले आहे. तसे तर हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना हा संपूर्ण भारत देशच मुसलमानांच्या घशात घालायचा आहे; पण त्यांना जेव्हा ही गोष्ट अवघड वाटली, तेव्हा त्यांनी हा वक्फ बोर्डाचा कायदा संमत करून अप्रत्यक्षपणे हिंदूची भूमी मुसलमानांच्या घशात घालण्याचे कटकारस्थान रचले. काँग्रेस पक्षाचे माजी आणि कठपुतली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी एकदा तर उघडपणे घोषित वक्तव्य केले होते, ‘या देशातील सर्व संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.’ मग प्रश्न असा उपस्थित होतो की, या देशात हिंदु बहुसंख्य असणे, हा हिंदु समाजाचा गुन्हा आहे का ? हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य रहाणार नाहीत, तर अन्य कोण असतील ? बरे या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना अल्पसंख्यांक समाज म्हणणे केवळ मुसलमान समाजच अभिप्रेत असतो.

मुळात या देशात पारसी, जैन, बौद्ध हे जे समाज अल्पसंख्य आहेत हे त्यांच्या खिजगणतीतही नसतात. डॉ. मनमोहनसिंह हे ‘या देशातील सर्व संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे’, असे वक्तव्य करून स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी स्वतःचे वक्तव्य प्रत्यक्ष कृती करून सत्यात उतरवले. वर्ष २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या, तेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर डॉ. मनमोहनसिंह यांनी भारताची राजधानी असलेल्या देहलीतील मोक्याच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल १२३ जागा वक्फ बोर्डाच्या कह्यात देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. जणू या देशातील हिंदूची भूमी ही मुसलमानांना खैरात वाटण्यासाठीच निर्माण झाली आहे. बरे, ‘अल्पसंख्य, अल्पसंख्य’ म्हणून ज्या मुसलमानांचे एवढे लांगूचालन हिंदुद्वेष्ट्या नेत्यांकडून सातत्याने होते, तो मुसलमान समाज आज या देशात अल्पसंख्यांक तरी राहिला आहे का ? वर्ष १९४७ मध्ये २ कोटी असणार्‍या मुसलमानांची लोकसंख्या आज २० ते २५ कोटींपर्यंत पोचली आहे.

अनेक राज्ये, जिल्हे, गावे मुसलमानबहुल झाली आहेत. जगातील ५७ इस्लामी राष्ट्रांपैकी एकाही इस्लामी राष्ट्रातील मुसलमानांची लोकसंख्या भारतातील मुसलमानांएवढी नाही, तरीही मुसलमानांचे एवढे लाड कुठपर्यंत चालणार ? हा भारत देश पूर्णपणे मुसलमानबहुल होईपर्यंत का ? असे काही प्रश्न या निमित्ताने मनात निर्माण होतात. ‘वफ्फ बोर्ड भारतातील ज्या भूमीवर हक्क सांगेल, ती भूमी वक्फ बोर्डाची होईल’, हा कायदा हिंदु, बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिस्ती यांपैकी कोण्याही धर्मियांसाठी नसून केवळ मुसलमानांसाठीच का बनवण्यात आला ? या प्रश्नांची उत्तरे हिंदुद्वेष्टे नेते देऊ शकतील का ?

१८. वक्फ बोर्डाच्या कायद्याचा बडगा दाखवून आदिवासींकडून बळजोरीने भूमी बळकावणे किंवा धर्मांतर करणे

या वक्फ बोर्डाला दिलेल्या अमर्यादित आणि राज्यघटनात्मक अधिकारांमुळे याचा मुसलमान समाजाने मोठ्या प्रमाणात अपवापर केलेला आहे. याची काही उदाहरणे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी त्यांच्या विवेचनातून दिली आहेत. जसे की, छबुआ हे मध्यप्रदेशातील आदिवासीबहुल गाव, मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून ७०० किलोमीटर दूर आहे. मग अशा गावात जाऊन वक्फ बोर्डातील मुसलमान गावातील आदिवासींना ‘तुमची सर्व घरांची भूमी, शेतभूमी ही वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे आणि ती भूमी तातडीने मोकळी करा’, अशी धमकी देतात. वाटल्यास तुम्ही आमच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकता; पण प्रथम ही भूमी मोकळी करणे आवश्यक असल्याचे सांगतात.

आदिवासी अडाणी, भोळे असतात. ते घाबरून जातात, मुसलमानांपुढे दीनवाणे होतात. त्यांनी कधी न्यायालयाची पायरी चढलेली नसते. त्यांनी कधी तालुका पातळीवरचे न्यायालय ही पाहिलेले नसते. मग ते भोपाळमधील वफ्फ बोर्डासमोर जाऊन तेथे स्वतःची तक्रार सादर करणे, तर फार दूरची गोष्ट. याखेरीज दावा लढण्यासाठी त्या गरीब आदिवासी समाजाजवळ पैसाही नसतो. आदिवासींची दीनवाणी अवस्था पाहून मग मुसलमान त्यांच्या पुढे धर्मांतर करून मुसलमान होण्याचा पर्याय ठेवतात. या पर्यायाचा स्वीकार करण्याव्यतिरिक्त आदिवासी बांधवांसमोर अन्य मार्ग नसतो. स्वतःची घरे, शेतभूमी वाचवण्यासाठी आदिवासी धर्मांतर करतात. अशा प्रकारे वक्फ बोर्डाच्या कायद्याचा आधार घेऊन सहस्रो आदिवासींचे धर्मांतर झाल्याचेही अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले.

१९. दूर रहाणार्‍या श्रीमंतांना कायद्याचा धाक दाखवून भूमी बळकावणे !

अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी वफ्फ बोर्डाला मिळालेल्या अधिकाराचा मुसलमान समाजाकडून अजून कसा दुरुपयोग केला जातो, याचे उदाहरण दिले आहे. वक्फ बोर्डाचे मुसलमान भारतातील सुदूर रहाणार्‍या अशा एखाद्या श्रीमंताला गाठतात की, जो राज्याच्या राजधानीपासून ४०० ते ५०० किलोमीटर दूर अंतरावर रहातो आणि ज्याला न्यायासाठी वक्फ बोर्डात जाणे शक्य नसते. मग अशा श्रीमंताच्या भूमीवर वक्फ बोर्ड आपला अधिकार असल्याचे सांगून, त्या श्रीमंताला त्याच्या भूमीवरचा ताबा सोडण्यासाठी सूचित करते. मग तो श्रीमंत माणूस वक्फ बोर्डाच्या सदस्यासमोर हात जोडून यासंबंधात काही तरी तडजोड करण्याची विनंती करतो. मग त्या श्रीमंताकडून ५ ते २५ लाख रुपये उकळून वक्फ बोर्ड तिचा दावा मागे घेण्याचे नाटक करते.

२०. वक्फ बोर्डाजवळ भारतातील ८ लाख ६५ सहस्र ६४६ एकर भूमीची मालकी !

असा हा भयानक वक्फ बोर्डाचा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, इराक, इराण, तुर्कीये, अशा एकाही इस्लामी राष्ट्रात नाही; पण तो हिंदु बहुसंख्य असणार्‍या भारतात मात्र लागू आहे. या कायद्यामुळे वक्फ बोर्ड भारतात संरक्षण आणि रेल्वे खाते यांच्याकडे जेवढ्या प्रचंड भूमीची मालकी आहे, त्याच्या खालोखाल ३ र्‍या क्रमाकांच्या भूमीचा मालक झाला आहे. सध्या वक्फ बोर्डाजवळ भारतातील ८ लाख ६५ सहस्र ६४६ एकर भूमीची मालकी असल्याचे सांगितले जाते.

२१. हिंदूंनी जागृत होऊन याविषयी जाब विचारावा !

यातील दुर्दैव असे की, येथील हिंदूंना ‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी असा वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य ठाऊकही नाही. हिंदू जनता तर जाऊ द्या; पण हिंदूंचे अनेक आमदार, खासदार आणि मंत्री यांसारख्या लोकप्रतिनिधींना ही या कायद्याविषयी ठाऊक असेल कि नाही ? याविषयी मला शंका आहे. त्यामुळे आता तरी हिंदूंनी जागृत होऊन आपल्याकडे मत मागण्यासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधींना याविषयी जाब विचारून हा वक्फ बोर्डाचा भयानक कायदा रहित करण्याची मागणी केली पाहिजे. अन्यथा ‘सब कुछ लुटाके होशमे आये तो क्या किया’ (सर्वकाही लुटून शुद्धीत आल्यावर ‘आपण हे काय केले ?’), असे म्हणण्याची पाळी हिंदु समाजावर येईल, हे निश्चित !’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.