हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

३ मार्च २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु संस्कृती खोलवर रुजली असल्याने स्वातंत्र्यानंतर मुसलमान राष्ट्र बनवण्याची योजना कार्यवाहीत आणणे कठीण, भारतातील हिंदुद्वेष्टे राजकीय पक्ष आतंकवादी संघटनांपेक्षाही घातक, हिंदुविरोधी कायदे करणारे हिंदुद्वेष्टे पक्ष, ख्रिस्ती आणि काफिरांना मारण्याचे शिक्षण देणारे मदरसे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

११. हिंदु मुले धर्मशिक्षणापासून दूर राहिल्याने होत असलेले दुष्परिणाम

श्री. शंकर गो. पांडे

वरील गोष्टीचे परिणाम असे झाले आहेत की, मुसलमान समाजातील अवघ्या ६ वर्र्षांची मुलेमुली कुराणामधील आयते धडाधड पाठ म्हणून दाखवतात. अल्ला आणि महंमद पैंगबर यांविना ते अन्य धर्मातील देवीदेवतांना मानत नाहीत. नमाज, जिहाद, रमजानमधील रोजे (उपवास) अशा आपल्या धर्मातील धार्मिक परंपरा त्यांना लहानपणापासून ठाऊक होतात आणि त्यांचे अनुकरण ते करू लागतात. मुली त्यांचे शरीरप्रदर्शन कधी होऊ देत नाहीत. याउलट हिंदु समाजातील लहान मुले तर सोडून द्या, शाळा-महाविद्यालये यांमध्ये शिकणार्‍या हिंदु मुलामुलींना आपल्या धर्मग्रंथांची नावे ठाऊक नसतात. रामायण, महाभारत यांतील मुख्य पात्रांचीही नावेही हिंदु मुले सांगू शकत नाहीत. मग धर्मग्रंथांचे वाचन आणि अभ्यास या पुष्कळ दूरच्या गोष्टी झाल्या.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुले व्यसनाधीन होतात, तर मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये फसतात. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचा कलम २८ द्वारे हिंदूकडून त्यांचे धार्मिक शिक्षण हिसकावून घेण्याचा हाच उद्देश होता. हिंदूंच्या दुर्दैवाने हिंदुद्वेष्टे नेते त्यांच्या उद्देशात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत.

१२. हिंदूंच्या मंदिर उभारणीचे कार्य प्रगत संस्कृतीचे प्रतीक !

हिंदूंचा मूर्तीपूजेवर पुष्कळ पूर्वीपासून अतूट असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आराध्य देवतांची अनेक आणि भव्य अशी मंदिरे भारतातील गावोगावी बांधली. या देशात असा एकही हिंदु राजा झाला नाही की, ज्याने मंदिरांची निर्मिती केली नाही. त्यांनी भारतात आसेतूहिमाचल भव्य मंदिरांचे बांधकाम केले. भारतातील प्राचीन मंदिरे जेवढी भव्य आहेत, तेवढीच ती त्यावरील शिल्पकामामध्ये अजोड आहेत. या मंदिरांचे अवलोकन केल्यानंतर आपल्या भारतियांचे वास्तूशास्त्र किती प्रगत आणि वैज्ञानिक होते, याची प्रचीती आल्याविना रहाणार नाही. मंदिरे बांधण्याचा हिंदूंचा सोस पूर्वी होता, तसा आजही कायम आहे; म्हणून हिंदु समाजाकडून आजही केवळ स्वदेशातच नव्हे, तर विदेशातही भव्यदिव्य मंदिरे उभारली जात आहेत. आता तर अनेक पाश्चात्त्य देशासमवेत काही मुसलमान राष्ट्रातही भव्य आणि नेत्रदीपक मंदिरे उभारली गेली आहेत.

१३. हिंदूंचे संघटन करणारी आणि हिंदूंचे शक्ती केंद्र असणारी मंदिरे !

हिंदूंची मंदिरे ही केवळ पूजा-प्रार्थनेची स्थळे नसून या मंदिरातून साहित्य, संगीत, नृत्यकला, कीर्तन, प्रवचन इत्यादी अनेक कलांचाही परिपोष झाला आहे. काही प्राचीन मंदिरे तर विद्येची केंद्रे होती. आजही भारतातील अनेक मंदिरांकडून शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, दवाखाने, गोशाळा, अन्नदान, गरिबांना साहाय्य, गावांचा विकास, संस्कार केंद्र, असे विविध सामाजिक उपक्रम निःशुल्कपणे राबवले जात असतात. मंदिरामध्ये प्रवेश करतांना हिंदूंना त्याची जात कधीही विचारली जात नाही. त्यामुळे जातीभेद विसरून हिंदूंना संघटित करण्याचे, त्यांना एका सूत्रात बांधण्याचे पुष्कळ मोठे कार्य या मंदिरांनी केले आहे. या मंदिरांनी लाखो हिंदूंना रोजगार मिळवून दिला आहे. एकंदरीत मंदिरे ही हिंदूंची शक्तीकेंद्रे, स्फूर्तीकेंद्रे आणि हिंदु धर्माचे भक्कम आधारस्तंभ आहेत.

१४. हिंदूंच्या मंदिरांची अफाट संपत्ती परकीय आक्रमकांनी अफगाणिस्तानात नेणे !

हिंदूंची मंदिरांवर अतीव श्रद्धा आहे. त्यामुळे हिंदू गरीब असोत कि श्रीमंत, राजा असो कि रंक, अशा सर्व स्तरांतील हिंदूंनी मंदिरांना सोने, चांदी, हिरे, माणिक मोती, पैसा, भूमी यांचे भरघोस दान दिले आहे. त्यामुळे या मंदिराजवळ पुष्कळ संपत्ती गोळा झाली. काही मंदिरांच्या मालकीची सहस्रो एकर भूमी आहे. तिरुपतीचे श्री बालाजी मंदिर, तिरूवनंतपुरम्चे श्री पद्मनाभस्वामीचे मंदिर अशा अनेक मंदिरातील संपत्तीची तर मोजदाद करणेही कठीण आहे. भारतातील मंदिराजवळच्या या अफाट संपत्तीचे वर्णन ऐकून परकीय आक्रमकांचे डोळे विस्फारले होते आणि त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. महंमद गझनीने एका वेळेस नाही, तर तब्बल १७ वेळा गुजरातमधील सोरटी सोमनाथाच्या मंदिरावर आक्रमण करून तेथील अफाट संपत्ती लुटली आणि ती सहस्रो घोडे अन् हत्ती यांवर लादून अफगाणिस्तानात नेली. इतर सर्व परकीय आक्रमकांनीही मंदिरांची संपत्ती तर लुटलीच; पण अनेक मंदिरे उद्ध्वस्तही केली.

१५. मंदिरांची संपत्ती हिसकावून घेणार्‍या ‘एच.आर्.सी.ई.’ कायद्याची निर्मिती !

(‘एस्.आर्.सी.ई. – हिंदु रिलिजन अँड चॅरिटेबल एन्डाऊमेंट्स’, म्हणजे ‘हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्ती अभिनियम)

स्वातंत्र्योत्तर काळात मात्र हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंची मंदिरे लुटण्याचे काम केले. परकीय आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे लुटली हाेती, तरीही हिंदूंच्या मंदिरांची श्रीमंती न्यून झालेली नव्हती. मंदिरांजवळची संपत्ती पाहून परकीय आक्रमकांप्रमाणे हिंदुद्वेष्ट्या नेत्यांची वक्रदृष्टी मंदिरांच्या संपत्तीवर पडली. त्यांच्याही तोंडाला पाणी सुटले. मग त्यांनी ही संपत्ती लुटण्यासाठी हिंदूंच्या अज्ञानाचा लाभ घेत वर्ष १९५१ मध्ये ‘एस्.आर्.सी.ई.’ नावाचा कायदा संमत करून हिंदूंची सर्व मंदिरे आणि मंदिरांची संपत्ती हिंदूंकडून हिसकावून घेत त्यावर शासनाचा अधिकार प्रस्थापित केला.

(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.