‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.


मी म्हणाले,
श्रीकृष्णा, आम्ही नेहमीच येतो तुझ्या गाभार्यात ।
तू येशील का रे माझ्या मनोगाभार्यात ।। १ ।।
श्रीकृष्ण म्हणाला,
कसा अन् कधी येऊ मी सांग ।
तुझ्या मनात तर लागली आहे विचारांची रांग ।। २ ।।
स्वभावदोष अन् अहं यांची बघ आहेत किती जळमटे ।
मन तुझे झाले आहे पुष्कळ खरकटे ।। ३ ।।
प्रतिक्रिया अन् पूर्वग्रह यांची साचली आहे धूळ ।
अपेक्षांचा बघ बसला आहे राप ।। ४ ।।
स्वच्छता करून नामस्मरणाचे रोप लाव ।
त्याला भक्तीभावाचे पाणी घाल ।। ५ ।।
श्रद्धेचे खत घाल ।
सत्सेवेचा घाम गाळ ।। ६ ।।
मग बघ, रोपाला भावाची सुगंधी फुले येतील ।
आणि भक्ताच्या भेटीला देव धावत येईल ।। ७ ।।
मी म्हणाले,
हो रे कृष्णा, प्रयत्न करण्याची शक्ती तूच दे रे भगवंता ।
माझ्यात साधनेची तळमळ तूच निर्माण कर ।। ८ ।।
श्रीकृष्णा, जशी झाली तुझी आणि सुदाम्याची भेट ।
अगदी तशीच होईल ना आपली भेट ।। ९ ।।
श्रीकृष्ण म्हणाला,
हो, तशीच होईल आपली भेट ।
|
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !