बेंगळुरूचे काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांची धमकी

नवी देहली – केंद्र सरकारने सिंचन प्रकल्पांच्या कर्नाटकच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. दक्षिणेकडील राज्यांकडून जमा होणारा पैसा केंद्र सरकार उत्तरेकडील राज्यांना देत आहे. त्यामुळे निधी वितरणात अन्याय होत आहे. केंद्र सरकारची अशीच प्रवृत्ती कायम राहिल्यास दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी आवाज उठवतील, अशी धमकी काँग्रेसचे बेंगळुरू ग्रामीणचे खासदार डी.के. सुरेश यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करतांना सुरेश यांनी संसदेबाहेर हे वक्तव्य केले.
डी.के. सुरेश पुढे म्हणाले की,
१. आम्ही केवळ आमच्या हक्काच्या निधीची मागणी करत आहोत. केंद्र सरकार दक्षिण भारतीय राज्यांना ‘जी.एस्.टी’ (वस्तू व सेवा कर) आणि प्रत्यक्ष कर यांचा योग्य वाटा देत नाही.
२. सध्या देशातील विविध राज्यांना निधीचे वितरण योग्य पद्धतीने होत नाही. दक्षिणेकडील राज्यांचा निधी उत्तरेकडील राज्यांमध्ये वळवला जात आहे. हा आमच्यावर अन्याय आहे.
३. केंद्राला आमच्याकडून ४ लाख कोटी रुपये मिळत आहेत आणि त्या मोबदल्यात आम्हाला जे मिळत आहे ते नगण्य आहे.
४. पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेले अनुदान राज्याला मिळालेले नाही, असेही डी.के. सुरेश यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !