सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. मूळ विषय पूर्णपणे वेगळा आहे. सरकारने दिलेले आरक्षण हे आधीपासूनच अस्तित्वात होते. त्या अधिसूचनेत सरकारकडून नवीन असे काहीच करण्यात आलेले नाही. ही अधिसूचना काढून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जर आरक्षणाचा प्रश्न मिटला असेल, तर मग कोर्टात ‘क्युरेटीव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) प्रविष्ट का आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जानेवारी या दिवशी उपस्थित केला आहे.