Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला गौहत्ती (आसाम) शहरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले !

पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट !

गौहत्ती (आसाम) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या न्याय यात्रा काढत आहेत. त्यांची न्याय यात्रा २३ जानेवाला आसामची राजधानी गौहत्ती येथे पोचली; परंतु पोलिसांनी त्यांना शहरात येण्यास अनुमती दिली नाही. पोलिसांनी शहराच्या सीमेवर बॅरिकेट्स (अडथळे) लावले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे अडथळे तोडले. त्यामुळे त्यांची पोलिसांसमवेत झटापट झाली. या घटनेवरून मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे

राहुल गांधी या घटनेविषी म्हणाले की, बजरंग दल आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांची फेरी त्याच मार्गावरून निघाली आहे, ज्या मार्गावर आमची यात्रा थांबवण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स हटवले आहेत. आम्ही कायद्याचे पालन करतो. त्यामुळे आम्हाला ज्या मार्गाने अनुमती मिळाली आहे, त्या मार्गाने हा प्रवास करण्यात आला.