आळंदी (जिल्हा पुणे) – येथे येणारे भाविक इंद्रायणी नदीत श्रद्धेने स्नान करतात, तसेच हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. प्रत्यक्षात मात्र इंद्रायणी नदीचे पाणी येथील नागरिक आणि देहू-आळंदी येथे येणार्या भाविकांच्या आरोग्यास धोकादायक बनले आहे, अशी वस्तूस्थिती आहे. तरी इंद्रायणी नदीचे पाणी तात्काळ प्रदूषणमुक्त करावे, या मागणीसाठी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर आणि त्यांचे सहकारी यांनी उपोषण चालू केले आहे. (असे उपोषण का करावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक) या प्रसंगी ह.भ.प. दत्तात्रय साबळे महाराज, माजी नगराध्यक्ष बबनभाऊ गुंडरे, ह.भ.प. संजय महाराज कावळे यांसह अन्य उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर यांचे उपोषण !
इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ह.भ.प. मोहनानंद महाराज पुरंदवाडकर यांचे उपोषण !
नूतन लेख
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- विद्यार्थी आंदोलनांनी फाडला अमेरिकेचा बुरखा !
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- प्राचीन मंदिरांमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे आकलन होते ! – इंद्रनील बंकापुरे, व्याख्याते