काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांचे विधान !

दावणगेरे (कर्नाटक) – काही जण आपल्या देशाला हिंदु राष्ट्र बनवायला निघाले आहेत. तसे झाले, तर आपला देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यासारखा होईल. धर्माच्या नावावर ते देश दिवाळखोर झाले आहेत. त्याप्रमाणे आपला देशही धर्मनिरपेक्षता सोडून धर्माच्या मागे लागल्यास प्रगती होणार नाही आणि देश दिवाळखोर होईल, असे विधान काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केले.
सौजन्य : इंडिया टूडे
यतींद्र सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, भाजप आणि तिची मातृसंस्था रा.स्व. संघ यांच्याकडून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला धोका आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणार्या पक्षांपासून आपण सावध असले पाहिजे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या ! |
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !