लातूर – वर्ष २०१६ मध्ये मिरज येथून रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागली होती. यावर्षीही पर्जन्यमान अत्यल्प झाले आहे. त्यामुळे पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी जनजागृती करण्यासाठी ‘वसुंधरा प्रतिष्ठान’ने लातूरच्या क्रीडा संकुलावरील झाडांना फलक लावले आहेत. त्यावर ‘पाण्याचा जपून वापर करा’, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्या मांजरा धरणातही पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लातूर महानगरपालिकेने सप्ताहातून १ वेळेस नळाला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ‘वसुंधरा’ प्रतिष्ठानकडून लातूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन !
‘वसुंधरा’ प्रतिष्ठानकडून लातूरकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दोंडाईचा (धुळे) येथे धर्मांधांकडून छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; नंदुरबार येथे ईदच्या मिरवणुकीत धर्मांधांची दंगल !
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन
- वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !
- छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त भव्य शोभायात्रा
- मिरवणुकीत नाचणार्या पोलीस कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !