३३ सहस्र ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक अन् भित्तीपत्रके हटवली !

मुंबई महापालिकेची कारवाई !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गेल्या १० मासांमध्ये मुंबईला विद्रूप करणारे ३३ सहस्र ७४२ राजकीय, व्यावसायिक आणि धार्मिक बॅनर्स, फलक अन् भित्तीपत्रके महानगरपालिकेने हटवली आहेत. त्यात ११ सहस्र ४१ राजकीय, ३ सहस्र १२१ व्यावसायिक, तर १९ सहस्र ५८० धार्मिक बॅनर्स, फलक आणि भित्तीपत्रके यांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेने शहराचे विद्रूपीकरण करणार्‍या ८०१ जणांविरुद्ध खटला प्रविष्ट केला आहे. ३७८ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?