
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पाचोड येथील अल्पभूधारक शेतकरी नारायण सरोदे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यांनी शेतात कपाशी आणि तूर पिकांची लागवड केली; मात्र पुरेशा पावसाअभावी पिके वाळून गेली. शेतीसाठी केलेला व्ययही भरून निघाला नाही. त्यामुळे हे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतूनच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
संपादकीय भूमिका :केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्यांपर्यंत पोचत नाहीत का ? कि आणलेल्या योजना पुरेशा नाहीत, हेही पहाणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद