
मुंबई – दसरा सणाविषयी काहीच बोलायचे नाही. एकमेकांची लफडी बाहेर काढायची, एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, याला ‘दसरा संमेलन’ म्हणतात का ? असा प्रश्न महाराष्ट्र करणी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या दसरा मेळाव्याविषयी उपस्थित केला आहे. २४ ऑक्टोबर या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्क येथे, तर एकनाथ शिंदे गटाकडून आझाद मैदान येथे दसरा मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यामध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दसरा मेळाव्याच्या व्यासपिठाचा उपयोग एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी होत असल्याविषयी वरील प्रतिक्रियेद्वारे सेंगर यांनी खंत व्यक्त केली.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद