मिरज – हस्त नक्षत्राचा प्रारंभ होतो, त्या दिवसापासून हादग्याचा प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी हत्तीचे चित्र भिंतीवर लावून त्याला हादग्याच्या फुलांची माळ आणि १६ प्रकारच्या फळांची माळ घालण्यात येते. पदार्थांची खिरापत महिलांनी आणून पदार्थ ओळखण्याचा कार्यक्रम होतो आणि खिरापत वाटली जाते. हिंदु धर्मातील अशा परंपरा लोप पावत आहेत. नवीन पिढीला संस्कृतीची माहिती होण्यासाठी या परंपरा जतन करणे अत्यावश्यक आहे. हस्त नक्षत्राचा पाऊस पडण्यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना करूया, असे आवाहन सांगलीच्या माजी महापौर सौ. संगीता खोत यांनी केले. भाजप मिरज शहर ‘ओबीसी शाखे’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी सुमनताई खाडे, सुनंदा खोत, शमा जाधव, विद्या गोसावी, साधना देसाई यांसह पुष्कळ महिला उपस्थित होत्या.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > हादग्यासारख्या परंपरा जतन करणे अत्यावश्यक ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर
हादग्यासारख्या परंपरा जतन करणे अत्यावश्यक ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर
नूतन लेख
- मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
- पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !
- सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
- सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !