हजारीबाग (झारखंड) येथे मशिदीजवळ शौर्य जागरण यात्रेतून परतणार्‍या हिंदूंवर दगडफेक !

हजारीबाग (झारखंड) – राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्याची घटना ८ ऑक्टोबरला घडली. या वेळी पोलीस तत्परतेने पोचल्याने मोठी हानी टळली. दगडफेकीत एका महिलेसमवेत १० जण घायाळ झाले. यापूर्वी रांची येथेही अशी घटना घडली होती. हजारीबागच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले, ‘या प्रकरणाची चौकशी केली जात असून दगडफेक करणार्‍यांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.’ धर्मांध मुसलमानांचा दावा आहे की, मशिदीसमोर येऊन हिंदूंची बस थांबली आणि ते धार्मिक घोषणा देऊ लागले.’ (मशिदीसमोर कुणी घोषणा देऊ नयेत, असा नियम आहे का ? आणि जर कुणी घोषणा दिल्या, तर त्यांच्यावर दगडफेक केली पाहिजे?, असे आहे का ? जर अशी मानसिकता असेल, तर त्याचा विचार हिंदूंनाही करावा लागेल, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘मशीद म्हणजे हिंदूंवर आक्रमण होण्याचे ठिकाण’, अशी आता नवीन व्याख्या करावी लागेल ! ‘इस्लाम म्हणजे शांती’ असे म्हटले जाते; मात्र त्यांच्या मशिदी मात्र अशांतता निर्माण करत आहेत !