दापोडी – येथील ‘भटक्या विमुक्त प्रतिष्ठा’न संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलतांना बाबा आढाव यांनी देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतले, तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे, त्याचे काय कराल ? असा प्रश्न सत्ताधारी नेत्यांना विचारला. (नथुराम गोडसे यांचे नाव देशात एक देशभक्त म्हणून परिचित आहे. देशभक्तांचे नाव देशवासियांच्या स्मरणात रहाते. – संपादक) देशाला इंडिया, भारत कि हिंदु राष्ट्र म्हणायचे हे महत्त्वाचे नसून इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न भेडसावत आहेत. (देशात अनेक प्रश्न असले, तरी देशाचे एक सुयोग्य नाव अंतिम करणेही आवश्यक आहे. – संपादक) तरुणांना रोजगार मिळत नाही. ते आरक्षणाच्या पाठीमागे लागले आहेत. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. नेत्यांना सत्तेची भूक असल्याने ते वारंवार पक्ष बदलतात. असं असलं तरीही आगामी निवडणुका जिंकण्यासाठी हे सर्व चालू आहे असेही आढाव म्हणाले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे ! – बाबा आढाव
देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे ! – बाबा आढाव
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
- प्राचीन मंदिरांमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचे आकलन होते ! – इंद्रनील बंकापुरे, व्याख्याते