समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद रहाणार !

छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्ग २ टप्‍प्‍यात ५ दिवसांसाठी बंद रहाणार आहे. समृद्धी महामार्गावर ‘पॉवर ग्रिड ट्रान्‍समिशन’ अतीउच्‍चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दोन्‍ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत बंद रहाणार आहे. समवेतच दुसर्‍या टप्‍प्‍यात २५ ते २६ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद रहाणार आहे, असे महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्‍प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.