छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्ग २ टप्प्यात ५ दिवसांसाठी बंद रहाणार आहे. समृद्धी महामार्गावर ‘पॉवर ग्रिड ट्रान्समिशन’ अतीउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दोन्ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत बंद रहाणार आहे. समवेतच दुसर्या टप्प्यात २५ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद रहाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळवले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद रहाणार !
समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद रहाणार !
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !