
कोल्हापूर – अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्याला जो मजकूर वाचण्यास सांगितला तो अमिताव घोष यांनी लिहिलेल्या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकातील आहे. असे असतांना यावर जाणीवपूर्वक राजकारण करून काँग्रेस, डावे, पुरोगामी हे अकारण ऋषितुल्य अशा पू. भिडेगुरुजी यांच्या अटकेची मागणी करून अश्लाघ्य शब्दात त्यांच्यावर टीका करत आहेत. तरी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार्यांवर कारवाई करा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना देण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, श्री. विजय गुळवे, कोल्हापूर जिल्हा बजरंग दल संयोजक श्री. पराग फडणीस, श्री. अक्षय ओतारी, श्री. प्रथमेश मोरे, विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष श्री. कुंदन पाटील, सहमंत्री श्री. अनिल दिंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री. राजू तोरस्कर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांसह धारकरी, तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तक्रार
कोल्हापूर – पू. भिडेगुरुजी यांच्यावर खोटे आरोप करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार यशोमती ठाकूर, आमदार छगन भुजबळ यांच्यावर कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. या वेळी धारकरी, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !