
कुडाळ – केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या सूचीत परराज्यातील लाभार्थी आढळल्याने शासनाकडून याची पडताळणी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. प्राथमिक पडताळणी प्रक्रियेत काही संशयास्पद लाभार्थ्यांना अपात्र ठरवून देय लाभ वसुलीची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावरून प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठीचे ‘ऑनलाईन’ अर्ज शासकीय कर्मचार्यांकडून सदोष भरले गेल्यामुळे असे लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत, असे मनसेचे पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या शिष्टमंडळाने कुडाळ प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिलेली सूत्रे . . .
१. काही गावांमधील लाभधारक शेतकर्यांची ‘ऑनलाईन’ माहिती सदोष भरली गेल्याने ते तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले आणि त्यांना लाभ देण्याचे थांबवण्यात आले आहे.
२. शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.
३. शेतकर्यांच्या ‘ऑनलाईन’ प्रस्तावांमधील चुका तात्काळ दुरुस्त करण्याची प्रक्रिया तहसील स्तरावर करण्यात यावी आणि अशा लाभार्थ्यांना मिळणारा लाभ गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावा.
या निवेदनाची नोंद घेऊन प्रांताधिकारी काळुसे यांनी ‘योग्य कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !