विधान परिषद कामकाज…

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बाल संगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत लाभाची संपूर्ण रक्कम मुलांना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलांना केवळ शैक्षणिक साहित्य किंवा खर्चासाठी साहाय्य करण्यात येते. त्यानुसार १४ कोटी ६८ लाख रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत २७ जुलै या दिवशी दिली.
बाल संगोपन योजनेसाठी निधीचे वाटप बाल न्याय निधीमधून करण्यात येत आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लेखशीर्षाखाली निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिली.
— NCPspeaks_Official (@NCPSpeaks1) July 27, 2023
या वेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालसंगोपन निधी २ सहस्र २५० रुपये प्रतिमास नियमितपणे देण्याचा प्रयत्न करू. त्यात कोणताही विलंब होणार नाही. त्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ज्यांचे अधिकोषात खाते नाही, त्यांना सर्वातोपरी सहकार्य केले जाईल.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !