कल्याण – महागडा भ्रमणभाष घेतल्याने वडिलांनी त्याविषयी विचारणा केल्यावर रागातून गळफास घेत राजवर्धन यादव (वय १७ वर्षे) या तरुणाने आत्महत्या केली. तो भ्रमणभाष घेण्यासाठी घरातून कुणालाही काही न सांगता पैसे घेऊन उत्तर प्रदेश येथून मुंबईत काकांच्या घरी आला होता. त्याने भ्रमणभाष घेतल्यावर वडील रागावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. कल्याण पत्रीपूल परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. (महागड्या भ्रमणभाषच्या आहारी जाणारी आणि संयम नष्ट झाल्याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई ! – संपादक) या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना ५ घंटे वेळ द्यावा लागला.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वडिलांनी महागड्या भ्रमणभाषविषयी विचारल्याने तरुणाची आत्महत्या
वडिलांनी महागड्या भ्रमणभाषविषयी विचारल्याने तरुणाची आत्महत्या
नूतन लेख
- नागपूर येथे दीड वर्षांत १५२ आर्थिक घोटाळे उघड !
- नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक
- नांदेडमध्ये युवकाने ई.व्ही.एम्. यंत्रावर कुर्हाडीने घाव घातले !
- छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंद !
- बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !
- पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !