सोलापूर – पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्या उजनी धरणातील पाणीसाठा ६ मे या दिवशी उणे पातळीमध्ये गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३६ दिवस आधीच धरणातील पाण्याची पातळी उणे झाली आहे. मागील वर्षी १३ जून या दिवशी उजनी धरणातील पाण्याची पातळी उणेमध्ये गेली होती. सध्या पाणीपातळी ४९१.०१५ मीटर असून एकूण साठा १७९९.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६३.५५ टी.एम्.सी. मृतसाठा उपलब्ध आहे. सध्या उजनी कालव्यातून ३ सहस्र क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. उजनी धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने आणि १० औद्योगिक वसाहती चालतात, तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांना या धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मागील ८ मासांत धरणातील ६० टी.एम्.सी. पाण्याचा वापर केला गेला आहे. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत पाणी सोडण्याचे नियोजन ढासळले असल्याने या वर्षी उजनी धरणाने लवकर तळ गाठला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > उजनी धरणातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत ३६ दिवस आधीच उणे झाली !
उजनी धरणातील पाण्याची पातळी गतवर्षीच्या तुलनेत ३६ दिवस आधीच उणे झाली !
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !
- रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !