४०१ गोवंशियांचा मृत्यू

रत्नागिरी – जिल्ह्यात ‘लम्पी’च्या लागणमुळे एकूण ४०१ गोवंशियांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवंशियांच्या मालकांना हानी सहन करावी लागत आहे. शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून लम्पीमुळे दगावलेल्या २०१ जनावरांच्या मालकांना हानीभरपाईचे ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे; मात्र अजुनही गोवंशियांच्या अन्य मालकांकडून हानीभरपाईची प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यात एकूण २ लाख ३५ सहस्र गोवंशीय पशूधन आहे. यापैकी ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. यामध्ये ४०१ गोवंशियांचा लम्पीमुळे मृत्यू झाला होता. या सर्व गोवंशियांच्या मालकांना हानीभरपाई देण्याचे शासनाने घोषित केले आहे.
राज्यात सर्वत्र लम्पीची लागण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही ३ सहस्र १०० गोवंशियांना लम्पीची लागण झाली होती. आतापर्यंत २ सहस्र २०० गोवंशियांवर उपचार होऊन ती आता बरी झाली आहेत. तर ४०० गोवंशियांवर अद्यापही उपचार चालू आहेत.
लम्पीला रोखण्यासाठी पशूसंवर्धन विभागाचे प्रयत्न !
याविषयी पशूसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. धनंजय जगदाळे म्हणाले की, शासनाने ९० पशूधन पर्यवेक्षकांची नियुक्ती केल्याने त्याचा जिल्ह्याला चांगला लाभ झाला. त्यामुळे जिल्ह्यात पशूंसाठी लसीकरणाला वेग आला. ९५ टक्के पशूंचे लसीकरण झाले आहे. शासनाकडून आलेली हानीभरपाईची रक्कम गोवंशियांच्या मालकांना वाटप करण्यात आली असून उर्वरित रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा