१. प्रेमभाव

‘श्रीमती भारती पालनताई पुष्कळ प्रेमळ आहेत. आम्ही ३ – ४ साधिका धान्य निवडण्याची सेवा चालू असते, तेथे ‘राईस रोटी’ (कुरकुरीत डोसे, अल्पाहाराचा एक प्रकार) निवडत असतो. तेव्हा पालनताई आमच्या समवेत असतात. मी ‘राईस रोटी’च्या पाकिटातील शेवटचा चुरा चाळण्याची सेवा करते. तेव्हा ताई थोड्या थोड्या वेळाने मला विचारतात, ‘‘माई, तुमचे हात दुखत नाहीत ना ? दुखत असतील, तर मला सांगा हं. मी थोडे चाळते.’’ तेव्हा ‘ताईंच्या माध्यमातून साक्षात् भगवंताने मला साहाय्याचा हात पुढे केला आहे’, असे मला जाणवते.
२. इतरांचा विचार करणे

मी त्यांच्या समोरून धान्य निवडलेली पिशवी वजन करण्याकरता ओढत नेत असतांना त्या मला म्हणतात, ‘‘माई थांबा, मी तुम्हाला साहाय्य करते. एवढी जड पिशवी तुम्ही एकट्याने नेऊ नका.’’ यावरून ‘त्या सहसाधकाची काळजी घेतात’, हे लक्षात येते.
पालनताईंची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतेे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कोमल चरणी, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती अनिता आत्माराम कोनेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७१ वर्षे ) (९.११.२०२२)
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !