
‘सर्वसाधारणतः साधकांना स्वतःच्या नेहमीच्या सेवा (उदा. ग्रंथसंकलन, संगणकावर चित्रे सिद्ध करणे) करायला आवडतात. त्यामुळे ते या सेवा मनापासून करतात. या सेवांमध्ये त्यांच्या मनाचा सहभाग चांगला असल्याने त्यांच्याकडून सेवा करतांना भावाच्या स्तरावर प्रयत्नही होतात. त्यामुळे त्यांना सेवेतून अधिक चैतन्य ग्रहण करता येते; मात्र काही साधक आश्रम स्वच्छतेची सेवा, आजारी किंवा वयस्कर यांची सेवा इत्यादी सेवा ‘सेवा सांगितली आहे म्हणून करणे’, अशा रितीने करतात. यामध्ये त्यांच्या मनाचा सहभाग तेवढा नसल्याने त्यांच्याकडून सेवेत भावाच्या स्तरावर विशेष प्रयत्न होत नाहीत, तसेच ‘ही सेवा अधिकाधिक चांगली कशी करू ?’, याविषयी त्यांना सुचतही नाही. त्यामुळे अशा सेवांमधून ते अपेक्षित असे चैतन्य ग्रहण करू शकत नाहीत. याचाच अर्थ, सेवा करण्याचा उद्देशच सफल होत नाही. साधकांनी ‘आपल्याकडून असे घडत नाही ना ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.
कोणतीही सेवा करतांना ‘देव या सेवेतून माझा प्रेमभाव आणि सेवाभाव वाढवणार आहे’, ‘देव या सेवेतून माझा मनोलय आणि बुद्धीलय करवून घेणार आहे’ इत्यादी दृष्टीकोन ठेवल्यास त्या सेवेत मनाचा सहभाग वाढून ती सेवा भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.’
– (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !