दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांतराचे केंद्र झालेल्या ‘येशू भवन’ला पोलिसांनी ठोकले टाळे !

प्रतिकात्मक छायाचित्र

दमोह (मध्यप्रदेश) – येथील ‘येशू भवन’मध्ये येत्या नाताळमध्ये ५०० लोकांचे धर्मांतर करण्यात येणार होते; मात्र स्थानिक जागरूक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पोलिसांनी आता याला टाळे ठोकले आहे.

धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार येशू भवन धर्मांतराचे केंद्र झाले आहे. येथे विविध आमिषे दाखवून धर्मांतर केले जात आहे. केरळमधील एक संघटनेकडून हे येशू भवन चालवण्यात येत आहे.  धर्मांतराच्या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली, तर एकूण ८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्‍या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !